मुंबई : राज्यातील राजकीय घडामोडी या वेगाने वेगवेगळ्या प्रकारे घडत असल्याचे दिसत आहे. काल सकाळी अचानक भाजप आणि राष्ट्रवादीच्या एका गटाने एकत्र येत सत्ता स्थापन केली. त्यामुळे राज्यात एकच वादळ निर्माण झाले. राष्ट्रवादी आणि शिवसेनेने राज्यात स्थापन करण्यात आलेल्या सरकारवर आक्षेप घेतला असल्याचेही सांगण्यात येत आहे. त्यातच शिवसेनेचे खासदार आणि नेते संजय राऊत यांनी आजदेखील आपला ट्विट करण्याचा सिलसिला चालुच ठेवला आहे.
— Sanjay Raut (@rautsanjay61) November 24, 2019
खासदार संजय राऊत यांनी शनिवारी झालेल्या शपथविधी सोहळ्यावर ट्विट करून टीका केली आहे. राऊत यांनी ‘ऍक्सिडेंटल शपथग्रहण’ असे ट्विटवरून म्हटले आहे. भाजपाने सरकार स्थापन केल्यानंतर संजय राऊत आक्रमक झाले आहेत. अजित पवार यांना ब्लॅकमेल केल्याचा आरोपही केला होता.