मुंबई – रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथे पत्रकार शशिकांत वारिसे यांचा घातपात झाल्याचे सरकारने विधानपरिषदेत लेखी उत्तरात म्हटले आहे. रिफायनरीविरोधात बातम्या प्रकाशीत केल्याने त्यांची हत्या झाल्याची शंका विरोधी पक्षांनी व्यक्त केली होती. यावर सरकारने विधानपरिषदेत लेखी उत्तर देताना शशिकांत वारिसे यांचा अपघात घडवून आणला गेल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी सध्या एसआयटी चौकशी सुरू आहे.
विधान परिषदेत विरोधकांनी शशिकांत वारिसे प्रकरणी लेखी प्रश्न सरकारला विचारला होता. यावर लेखी उत्तरात शशिकांत वारिशे यांची जाणीवपूर्वक नाणार परिसरात वाहन अपघात घडवून आणल्याची अखेर सरकारची कबुली दिली. सध्या या प्रकरणी एसआयटीची चौकशी सुरू असल्याची देखील सरकारकडून लेखी उत्तरात माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, शशिकांत वारिसे यांचा 6 फेब्रुवारी रोजी दुपारी दुचाकीने जात असताना त्यांच्या वाहनाला पेट्रोल पंपासमोर एका वाहनाने धडक दिली होती. त्यात गंभीर जखमी झालेल्या वारिसे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आहे. त्यानंतर उपचारदरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता.