तीन तरुण जागीच ठार तर टेम्पोचालकाचा घटनास्थळावरून पळ
कोल्हापूर : कोल्हापूर-सांगली बायपास मार्गावर आज सकाळी एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तीन जण जागीच ठार झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. शिरोळ तालुक्यातील जैनापूर गावात ही घटना घडली आहे.
आज सकाळी टेम्पो आणि मोटारसायकल यांच्यात जैनापूर गावात समोरासमोर धडक बसली. ही धडक एवढी भीषण होती की यात तीन युवक जागीच ठार झाले. दरम्यान, या अपघातानंतर टेम्पोचालकाने घटनास्थळावरून पळ काढला असल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात गुणपाल रोजे (वय 27), सुहास कोठावळे (26, दोघेही रा. मजले, ता. हातकणंगले) तर अजिंक्य ऊर्फ विपुल रमेश पाटील-रायगोंडा (26, रा. दानोळी) या तिघांचा मृत्यू झाला आहे. घटनेमुळे दानोळी आणि मजले गावावर शोककळा पसरली असून जयसिंगपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.