पवनानगर – पवनमावळ परिसरासह तालुक्यात भात कापणीजा वेग आला आहे. गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसामुळे भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. करपा रोगामुळे ही भातशेतीला फटका बसला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्यामुळे शेतकऱ्यांनी गुरुवारपासून भात कापणी व ठोकणीच्या (झोडणीच्या) कामांना वेग आला आहे. मावळ तालुका भात पिकासाठी प्रसिद्ध आहे. भात काढणी बांधणी व ठोकणी (झोडणीाच्या) कामांना वेग आला आहे. मजुरांचा तुडवडा असल्यामुळे काही शेतकरी यंत्राच्या साह्याने भात कापणी करीत आहेत. तर मुजुरांचा तुडवडा असल्यामुळे शेतकरी जेवढ पीक हाताशी येईल, तेवढं पीक कस वाचवता, असा प्रयत्न करते आहे.