चिंबळी – निसर्ग चक्रीवादळामुळे खेड तालुक्याच्या दक्षिण भागात बुधावारी (दि. 3) झालेल्या दमदार पावसामुळे बळीराजा खरीप हंगामातील पेरणीच्या कामाला लागला आहे. चिंबळी, कुरूळी, मोई, निघोजे, केळगाव, मरकळ, गोलेगाव, सोळू, धानोरे, वडगाव घेनंद, चऱ्होली खुर्द, मोशी परिसरातील शेतकरी वर्गानी शेतीची मशागतीचे कामे सुरू करण्यात आले आहे.
मुसळधार पावसाने शेतात मोठ्या प्रमाणात ओल निर्माण झाली असल्याने शेतकरी वर्गानी बैलाच्या व ट्रॅक्टरच्या साह्याने नागरंणी व पन्नी करून विविध प्रकारच्या गवताची वेचणी करून शेणखत टाकून खरीब हंगामातील सोयाबीन, मूग, उडीद, वाल, चवळी आदि पिकांच्या पेरणीसाठी बळीराजाची लगबग सुरू आहे.