बालाकोट एअर स्ट्राइक करणारे पायलटही होणार सन्मानित
नवी दिल्ली – प्रत्येक भारतीयांना अभिमान असणारे विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांना वीर चक्राने सन्मानित करण्यात येऊ शकते, तसेच पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये दहशतवादी छावण्यांना निशाणा बनवून एअर स्ट्राइक करणाऱ्या मिराज 2000 च्या वैमानिकांना हवाई दल मेडल प्रदान करण्यात येणार आहे. या संदर्भातील महत्त्वपूर्ण घोषणा येत्या स्वातंत्र्यदिनी म्हणजे 15 ऑगस्टला होण्याची शक्यता आहे.
विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांनी 27 फेब्रुवारी 2019 रोजी पाकिस्तानी एफ-16 लढाऊ विमानाला लक्ष्य करून पाडले होते. या पाकिस्तानच्या विमानाने भारतीय हद्दीत घुसखोरी केली होती. ही कारवाई करत असताना अभिनंदन वर्थमान यांचे मिग 21 हे विमान दुर्घटनाग्रस्त झाले होते. त्यावेळी ते पॅराशूटच्या मदतीने पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीरात उतरले. त्यावेळी पाकिस्तानच्या सेनेने त्यांना अटक केली. पण पाकिस्तानच्या कैदेत त्यांनी ज्या प्रकारचे धैर्य दाखवले, त्यामुळे कोट्यवधी भारतीयांना त्यांचा अभिमान वाटला होता.
एफ 16 आणि मिग 21 ही दोन्ही दोन वेगवेगळ्या पीढींचे लढाऊ विमाने आहेत. मिग-21 च्या तुलने एफ-16 हे अधिक प्रगत आहेत. अशात अभिनंदन यांनी पाकिस्तानी लढाऊ विमान पाडले असल्याने यात सर्वात महत्त्वाची वर्थमान यांची वैयक्तीक कुशलता महत्त्वाची होती.
अशा प्रकारे मिग 21 या लढाऊ विमानाने एफ 16 या विमानाला पाडणे ही आतापर्यंतही ही पहिली घटना आहे. अधिकृत सूत्रांनुसार भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानी विमानाला पाडले आणि पाकिस्तानी लष्कराच्या ताब्यात असताना ज्या वीरतेचे दर्शन दाखवले त्यासाठी सरकारने त्यांना वीर चक्राने सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे.