मुंबई – कला, साहित्य आणि राजकारण अशा प्रत्येक क्षेत्रात मुशाफिरी करणारे “अभिजित बिचुकले” त्यांच्या अनोख्या स्टाईलमुळे कायम चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा बिग बॉस फेम बिचकुले चर्चेत आले होते. यापूर्वी सुद्धा बिचकुले अनेक वेळा निवडणुकीच्या रिंगणात उतरला होता. यावेळी पुन्हा एकदा ते पंढरपूर विधानसभा निवडणूक लढवायचा निर्णय चर्चेत आले आहे .
मंगळवेढा येथील पाणीप्रश्न सोडवणार असल्याचा वादा करत निवडणुकीत निवडून येणार असा विश्वासही अभिजीत बिचुकले यांनी व्यक्त केला आहे. या निवडणुकीबाबत पत्रकारांशी बोलतांना त्यांनी मविआ सरकारवर टीका केली आहे. राज्यातील उद्दाम प्रशासकीय अधिकाऱ्यांना सुतासारखं सरळ करण्यासाठी आपण ही निवडणूक लढवत असल्याचं त्यांनी म्हंटले आहे.
पंढरपूर विठू माउली मुळे प्रसिद्ध आहे पण एखाद्या खेडेगावापेक्षा भकास हे पंढरपूर झाले आहे, मन रमत नाही मात्र विठू माउलीसाठी याव लागतंय. निवडणुका लढत असताना मला अनेक अनुभव आले त्यावेळी माझ्यावर कोणीच दबाव आणला नाही मात्र, तो नालायक विश्वजीत कदम आहे त्याने माझ्यावर पोटनिवडणुकीत अत्याचार केला आहे. असा सनसनाटी आरोप अभिजित बिचुकले यांनी केला आहे. यापूर्वी, वरळीला आदित्य ठाकरे यांच्या विरोधात बिचुकले यांनी निवडणूक लढवली होती .