Aamir Khan: बॉलिवूड अभिनेता आमिर खान सध्या पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, पण यावेळी त्याच्या चित्रपटामुळे नाही तर एका वेगळ्याच सवयीमुळे. प्रत्येक विमानप्रवासाआधी तो एक खास चिठ्ठी लिहितो, असा खुलासा त्याने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत केला आहे. या सवयीमागचं कारण ऐकून अनेकांना आश्चर्य वाटत आहे. आमिर खानने सांगितलं की, तो जेव्हा एखाद्या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण करून पोस्ट-प्रोडक्शनच्या टप्प्यात असतो, तेव्हा तो आपल्या चुलत भावाला मन्सूर खानसाठी एक चिठ्ठी लिहितो. या चिठ्ठीत तो लिहितो की, “जर माझं विमान क्रॅश झालं आणि मी वाचलो नाही, तर माझ्या चित्रपटाचं पुढचं काम मन्सूर खानच्या सल्ल्याने पूर्ण करावं.” आमिरच्या म्हणण्यानुसार, त्याला विमानप्रवास करताना कधी कधी भीती वाटते. त्यामुळे तो आधीच सर्व गोष्टी व्यवस्थित करून ठेवतो, जेणेकरून त्याच्या अनुपस्थितीत चित्रपट चुकीच्या पद्धतीने पूर्ण होऊ नये. तो मन्सूर खानवर खूप विश्वास ठेवतो आणि त्यांची निर्णयक्षमता उत्तम असल्याचं मानतो. तो पुढे म्हणाला की, “मन्सूर खान हा असा माणूस आहे ज्याच्या अंतःप्रेरणेवर मला पूर्ण विश्वास आहे. मी किरणलाही अनेक वेळा सांगितलं आहे की, जर मला काही झालं तर चित्रपटाच्या कामात मन्सूरचा सल्ला घ्यावा.” आमिरने हे सगळं थोड्याशा हलक्या-फुलक्या अंदाजात सांगितलं, पण त्यामागे त्याची कामाप्रती असलेली गंभीरता स्पष्ट दिसते. Aamir Khan मन्सूर खान यांनीही या गोष्टीवर प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितलं की, त्यांना अलीकडेच या सवयीबद्दल समजलं आणि ते ऐकून त्यांनाही थोडी चिंता वाटली. मन्सूर खान हे स्वतःही एक प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत. त्यांनी ‘कयामत से कयामत तक’, ‘जो जीता वही सिकंदर’ आणि ‘अकेले हम अकेले तुम’ यांसारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. २००० नंतर त्यांनी दिग्दर्शनातून थोडं दूर राहण्याचा निर्णय घेतला असला, तरी ते आमिर खानला वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात. जेव्हा आमिर खान एखाद्या नवीन टीमसोबत काम करत असतो, तेव्हा तो मन्सूर खानला क्रिएटिव्ह प्रोड्यूसर म्हणून जोडतो. त्यामुळे चित्रपटाचं काम योग्य दिशेने जावं, याची तो खात्री करतो. उदाहरणार्थ, ‘जाने तू… या जाने ना’ या चित्रपटातही मन्सूर खान क्रिएटिव्ह प्रोड्यूसर म्हणून सहभागी होते. सध्या आमिर खान त्याच्या मुलगा जुनैद खानच्या ‘एक दिन’ या चित्रपटामुळेही चर्चेत आहे. या चित्रपटात साई पल्लवी मुख्य भूमिकेत आहे. आमिर खान या चित्रपटाचा निर्माता असून मन्सूर खानही या प्रोजेक्टमध्ये सहभागी आहेत. एकंदरीत, आमिर खानची ही सवय त्याच्या कामाप्रती असलेली जबाबदारी आणि गंभीरता दाखवते. आपल्या अनुपस्थितीतही काम नीट पार पडावं, यासाठी तो आधीच तयारी करून ठेवतो, हे विशेष आहे.