– शिवशंकर निरगुडे
हिंगोली – हे आहेत… ‘हर्षवर्धन पंडित’ मूळचे आडगाव येथील रहिवासी यांचं शिक्षण एमबीए झालंय, मात्र त्यांना नोकरी मध्ये सुरुवाती पासूनच रुची नव्हती, परंतु शिक्षण झाले आणि अचानक व्यवसायात जायचं कसं त्यामुळे त्यांनी एका नामांकित कंपनीमध्ये उच्च पगाराची नोकरी स्वीकारली मात्र तेथेही त्यांचे मन लागत नव्हते त्यांनी व्यवसायात उतरायचे पक्का निर्धार केला.
परंतु व्यवसाय करायचा कोणता त्यांनी सुरू केली शोधाशोध यामध्ये त्यांनी शेळी पालन, कुक्कुटपालन या व्यवसायाची माहिती घेतली, मात्र यातून फारसे काही उत्पन्न मिळण्यासारखे नाही, त्यामुळे त्यांनी लागलीच ‘मशरूम’ या शेतीची युट्युब व सोशल मीडियावर माहिती घेतली. ही शेती खरोखरच कितपत उपयोगी आहे. याची शहानिशा करून त्यांनी मशरुम हाच व्यवसाय करण्याचा पक्का निर्णय घेतला मग त्यांनी कंपनीतील आपल्या पदाचा राजीनामा दिला.
पंडित यांची गावाला लागूनच तीन एकर शेती आहे. सर्वप्रथम आपला प्रस्ताव त्यांनी आपल्या वडिलांना सांगितला वडिलांनी देखील मुलाच्या शब्दाला होकार देत तयारी दर्शवली त्यानुसार झाला पुढील प्रवास सुरू आर्थिक चंचन भासत होती. मात्र वडिलांनी आणि हर्षवर्धन यांनी आपल्या कडील काही पैसे व इतरांकडून घेतलेले पैसे यामध्ये गुंतवण्यास सुरुवात केली. सुरुवातीला आपल्या मित्राकडून सोयाबीनचे कुटार आणले नंतर त्यावर प्रक्रिया करून मशरूमची बीजे लावली, याला सुरुवातीला तीन ते साडेतीन लाखा पर्यंत खर्च आला,
शेड उभारणी मशरूमसाठी इकडून-तिकडून सोयाबीन कुटाराची व्यवस्था केली. पहिल्याच वर्षी मशरूमचे उत्पादन कमी झाले मात्र हळूहळू सर्व माहिती होत गेली उत्पादन वाढत गेले मात्र, मध्यंतरी आलेल्या कोरोनाच्या लाटे मुळे मोठी अडचण निर्माण झाली. आता पुन्हा यावर्षीपासून चांगले उत्पादन निघत आहे. मागणी देखील मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे महिन्याकाठी 50 ते 60 हजार रुपये या मशरूम विक्रीतून निघतात विशेष म्हणजे हर्षवर्धन पंडित हे स्वतःमार्केटिंग करत स्वतः मशरूमची विक्री करतात.