दुबई -दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंत याच्या नावावर एक अनोखी कामगिरी नोंदली गेली आहे. दिल्ली संघाचे नेतृत्व करताना सर्वात जास्त सामने जिंकण्याचा विक्रम पंतच्या नावावर जमा झाला आहे.
पंतच्या नेतृत्वात दिल्ली संघाने स्पर्धेच्या अमिरातीत सुरु असलेल्या दुसऱ्या पर्वातही कायम राखली. दिल्लीला क्वालिफायर 2 गटाच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सकडून पराभव पत्करावा लागल्याने त्यांचे स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्याचे तसेच स्पर्धेचे विजेतेपद मिळवण्याचे स्वप्न भंग झाले.
यंदाच्या मोसमात तसेच स्पर्धेच्या इतिहासात दिल्लीने सर्वाधिक सामने जिंकण्याची कामगिरी केली. पहिल्या पर्वात झालेल्या 8 पैकी 6 सामने जिंकून प्लेऑफमधील स्थान दिल्लीने निश्चित केले. दुसरे पर्व सुरु झाल्यावर दिल्लीने एकूण 14 सामन्यांपैकी 10 सामने जिंकून प्ले ऑफमध्ये स्थान मिळवले.