गुवाहाटी : आसाममध्ये बंदी घातलेल्या आठ संघटनांच्या 644 दहशतवाद्यांनी गुरूवारी शरणागती स्वीकारली. त्यांनी 177 शस्त्रे सरकारजमा केली.
उल्फा, एनडीएफबी, आएनएलएफ, केएलओ, सीपीआय (माओवादी), एनएसएलए, एडीएफ आणि एनएलएफबी या संघटनातील दहशतवाद्यांनी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या उपस्थितति झालेल्या कार्यक्रमात त्यांनी शरणागती स्वीलारली. त्यांनी 177 शस्त्रे जमा केली.
हा आसाम पोलिसांसाठी हा महत्वाचा दिवस आहे. 644 दहशतवादी आणि आठ संघटनांचे नेते यांनी शस्त्रे खाली ठेवली आहेत, असे आसामचे पोलिस प्रमुख ज्योती महंत यांनी सांगितले. अलीकडच्या काळात दहशतवाद्यांची सर्वात मोठी शरणागती आहे.