बंगळुरू- करोना संसर्गाची तिसरी लाट भारतात ऑक्टोबरमध्ये येण्याची शक्यता आहे. मात्र दुसऱ्या लाटेपेक्षा तिचे नियंत्रण अधिक चांगल्या पद्धतीने करू. आणखी वर्षभर या साथीचा धोका कायम राहील, असा रॉयटर्स या वृत्त संस्थेने वैद्यकीय तज्ज्ञांच्या सर्वेक्षणाचा निष्कर्ष आहे.
40 आरोग्य तज्ज्ञ, डॉक्टर, विषाणू तज्ज्ञ, साथरोग तज्ज्ञ, आणि प्राध्यापकांशी 3 ते 17 जून या काळात चर्चा करून हे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात जगात सर्वत्र सुरू असणाऱ्या लसीकरणामुळे नव्या लाटेला आळा बसेल, असा आशावाद व्यक्त करण्यात आला आहे.
तिसऱ्या लाटेचा अंदाज व्यक्त करणाऱ्या 24 पैकी 21 जणांनी तिसरी लाट ऑक्टोबरमध्ये येईल असे सांगितले. त्यात ही लाट लवकरात लवकर ऑगस्टमध्ये येईल, असे मत व्यक्त केले. तर 12 जणांनी ही लाट सप्टेंबरमध्ये येईल असे सांगितले. अन्य तीन जणांच्या मते हा काळ नोव्हेंबर ते फेब्रुवारी या दरम्यान असेल.
दुसऱ्या लाटेत लस, औषधे, ऑक्सिजनची टंचाई आदी कारणांमुळे पहिल्या लाटेच्या तुलनेत अधिक धोकादायक होती. त्या तुलनेत तिसरी लाट अधिक सहजतेने नियंत्रणात आणता येईल असा विश्वास 34 पैकी 24 म्हणजे सुमारें 70 टक्के तज्ज्ञानी व्यक्त केले.
ही साथ खूपच नियंत्रणात असेल. कारण लसीकरण अधिक झाले असेल, आणि दुसऱ्या लाटेपासून काही अंशी नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती तयार झाली असेल, असे एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितले.
या तिसऱ्या संभाव्य लाटेत 18 वर्षांखालील मुलांना अधिक धोका आहे का या प्रश्नाला 40 पैकी 26 तज्ज्ञानी होकारार्थी उत्तर दिले. त्याचे मुख्य कारण त्यातील बहुतांश जणांचे लसीकरण झाले नाही. कारण त्यांच्यासाठी सध्या लसच उपलब्ध नाही, असे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स मधील साथरोग विभागप्रमुख डॉ. प्रदीप बाननंदूर यांनी सांगितले. जर मुलांना मोठ्या प्रमाणात संसर्ग झाला आणि आपण तयार नसलो तर अखेरच्या क्षणी आपण काही करू शकणार नाही, असे कर्नाटकचे साथ प्रतिसाद नियोजन कमिटीचे सल्लागार डॉ. देवी शेट्टी यांनी सांगितले. ते म्हणाले, देशात लहान मुलांचे अतिदक्षता बेड खूपच कमी असल्याने ती एक वेगळीच समस्या बनेल. 14 सदस्यांनी मात्र मुलांना धोका नसल्याचे मत व्यक्त केले.
सध्याच्या लसीला भविष्यातील विषाणूंचे प्रकार अपरिणामकारक ठरवू शकणार नाहीत, असे मत 38 पैकी 25 तज्ज्ञांनी व्यक्त केले. 41 पैकी 30 तज्ज्ञांनी करोनाचा धोका आणखी वर्षभर राहील असे मत व्यक्त केले.
कोविड 19 ही सुटणारी समस्या आहे. त्यापासून सुटका देणारी लस जेवढी सहज आहे तेवढेच ते सहज आहे. लास आणि या साथीच्या संपर्कात आल्याने भरतात येत्या दोन वर्षात सामूहिक प्रतिकारशक्ती तयार होईल, असा अंदाज ग्लोबल व्हायरस नेटवर्कचे वैज्ञानिक सल्लागार रॉबर्ट गल्लो यांनी व्यक्त केला.