चेन्नई : इव्ही रामस्वामी पेरीयार यांच्या तामिळनाडूतील कांचीपुरम जिल्ह्यात विटंबना करण्यात आली.
गेल्या आठवड्यात सुपरस्टार रजनिकांत यांनी पेरीयार यांच्याबाबत वादग्रस्त विधाने केली होती. त्यानंतर विटंबनीे ही घटना घडली. या विटंबनेच्या कृत्याचा सर्व पक्षांनी निषेध केला आहे.
सलवक्कम येथील पेरीयार यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याचे शुक्रवारी सकाळी निदर्शनास आले. त्यानंतर तेथे तणाव निर्माण झाला. पुतळ्याची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर कडक कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.