मुंबई – ऑगस्ट 6 रोजी रिझर्व बॅंक रेपो दरात पाव टक्क्यांची कपात करण्याची शक्यता विश्लेषकांना वाटते. महागाई वाढण्याची शक्यता असूनही त्याकडे दुर्लक्ष करून रिझर्व्ह बॅंक व्याजदरात कपात करील, असे ईक्रा या संस्थेच्या अर्थतज्ज्ञ आदिती नायर यांनी सांगितले.
महागाई चार टक्क्यांच्या आत रोखण्याचे बॅंकेने ठरविले असूनही हा महागाईचा दर सध्या 6.09 टक्यांवर गेला आहे. त्यातल्या त्यात अन्नधान्याच्या किमती वाढत आहेत. मात्र, करोनामुळे विस्कळीत झालेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी रिझर्व्ह बॅंक व्याजदरात कपात करेल, असे युनियन बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजकिरण राय यांनी सांगितले.