पुणे – खासगी फायनान्स कंपनीकडून कर्ज घेऊन विकत घेतलेली कार ग्राहक सादर करू न शकल्याने ग्राहकावर केलेला फसवणूक, विश्वासघाताचा फौजदारी स्वरूपाचा दावा न्यायालयाने रद्द केला. अतिरिक्त मुख्य न्यायदांडाधिकारी न्यायाधीश एम.एस. आगरवाल यांनी हा आदेश दिला आहे. यासाठी सुमारे सात वर्षांचा कालावधी लागला. कार विकली अथवा दुसऱ्या व्यक्तीच्या नावाने केल्याच्या संशयाने कंपनीने हा दावा दाखल केला होता.
श्रीराम सिटी फायनान्स कंपनीने विजय खोपडे यांच्याविरोधात 2012 मध्ये हा दावा दाखल केला होता. खोपडे यांनी टाटा इंडिका कार खरेदीसाठी कंपनीकडून 88 हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. याबाबतच्या करारानंतर गाडी विकत घेतली. त् मात्र महिन्याचा हप्ता भरण्यास खोपडे निष्काळजीपणा झाला. त्यानंतर 1 डिसेंबर 2011 रोजी कंपनीने त्यांना वाहन सादर करा, अशा आशयाची नोटीस कंपनीने बजावली असे फिर्यादीत म्हणाले आहे. मात्र, खोपडे यांनी गाडी सादर केली नाही. त्यामुळे ती गाडी दुसऱ्याच्या नावावर असल्याची अथवा विकल्याची अथवा तिसऱ्या व्यक्तीला दिल्याचे कंपनीच्या निष्कर्ष काढून फसवणूक, विश्वासघात केल्याचे म्हणत भा.द.वि कलम 420,406 आणि 403 नुसार गुन्हा दाखल केला. या प्रकरणात खोपडे यांच्या वतीने ऍड. रोहित देशपांडे यांनी न्यायालयात बाजू मांडली.
आरोपी ह्यांच्या सदर वित्त कंपनीला मूलतः फसवणूक करण्याचा हेतू होता असे फिर्यादी ह्यांनी त्यांच्या फिर्यादीनुसार सिद्ध करू शकले नाहीत, भा.द.वि कलम 420,406 आणि 403 व्याख्येत सदर फिर्याद नुसार त्यांनी फसवणूक केली असे म्हणता येणार नाही. आरोपीह्यांनी कसलीही फसवणूक केलेली नसून, फौजदारी ऐवजी दिवाणी दावाही फायनान्स कंपनी दाखल करून योग्य कायदेशीर कारवाई करून आरोपी ह्यांच्या कर्ज रकमेची वसुलीसाठी दावा दाखल करून हा मुद्दा उपस्थित करू शकत होते. मात्र, त्यांनी तसे केले नाही.
तसेच गाडी विकल्याचे अथवा इतर कोणत्याही बाबीचे ठोस पुरावे ते सादर करू शकते नाहीत. अश्या सर्वबाबींचा विचार करून आरोपीचा प्राथमिक फसवणूकीचा हेतू स्पष्ट दिसत नसल्याने हा दावा न्यायालयाने आरोप निश्चितीपूर्व सुनावणीत फेटाळला. मात्र, हे सर्व होण्यास पक्षकाराचा सात वर्षाचा कालावधी खर्च करावा लागला, परंतु आरोप निश्चित होवून पक्षकारांना भविष्यात होणाऱ्या त्रासाला न जाता योग्य न्याय मिळून खटला संपायचा आनंद पक्षकारांना मिळाल्याची भावना ऍड. देशपांडे यांनी यावेळी व्यक्त केली.