मुंबई – केंद्र सरकारने मुंबईतील नियोजित आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रे गुजरातेत गांधीनगरला हलवण्याचा निर्णय घेतला आहे त्या निर्णयावर सर्व राजकीय पक्षाकडून मोदी सरकारवर जोरदार टीका होत आहे. या टीकांवर भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर टीकास्त्र सोडलं आहे.
IFSC च्या निमित्ताने ‘महाराष्ट्र विरुद्ध गुजरात’ अशी नवी स्क्रिप्ट लिहिली जाते आहे. परंतु जनता मूर्ख नाही.
2009 मध्ये IFSC चा प्रस्ताव नाकारल्याबद्दल दोन्ही कॉंग्रेसने राज्याच्या जनतेची माफी मागावी. शिवसेनेच्या बोलभांड नेत्यांनी त्यांना जाब विचारण्याची हिम्मत दाखवावी.— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) May 3, 2020
दरम्यान, IFSC च्या निमित्ताने ‘महाराष्ट्र विरुद्ध गुजरात’ अशी नवी स्क्रिप्ट लिहिली जाते आहे. परंतु जनता मूर्ख नाही. 2009 मध्ये IFSC चा प्रस्ताव नाकारल्याबद्दल दोन्ही कॉंग्रेसने राज्याच्या जनतेची माफी मागावी, अशी मागणी करत शिवसेनेच्या बोलभांड नेत्यांनी त्यांना जाब विचारण्याची हिम्मत दाखवावी, असं अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे.
आज जे लोक गळे काढून ओरडत आहेत, ते 2007 ते 2014 या काळात सत्तेत होते आणि त्यांनी मुंबईच्या आयएफएससीसाठी शून्य योगदान दिले. त्या संधीचा गुजरातने त्यावेळी फायदा घेतला.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 2, 2020
तर विरोधी पक्षनेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील IFSC च्या मुद्द्यावरून काँग्रेस राष्ट्रवादीवर टीकास्त्र सोडलं आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रासंबंधी भ्रम पसरवण्याचा प्रयत्न सुरु आहे. आपलं अपयश लपवण्यासाठी छाती बडवण्याचा हा प्रकार आहे. नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर कायम टीका करण्यासाठी काही लोकांना केवळ सोयीच्या गोष्टींचं स्मरण होतं, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
तत्पूर्वी, या मुद्यावरून निर्णयावर राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी जोरदार टीका केली आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. तिचे हे महत्त्व कमी करण्यासाठीच हा निर्णय घेण्यात आला आहे असा आरोप बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. हे केंद्र गांधी नगरला हलवण्याची अधिसूचना नुकतीच केंद्र सरकारने जारी केली आहे. थोरात यांनी म्हटले आहे की केंद्र सरकारचा हा निर्णय निराशाजनक आहे. केंद्र सरकारने या निर्णयाचा फेरविचार केला पाहिजे अशी मागणीही थोरात यांनी आपल्या ट्विटर संदेशात केली आहे. या साऱ्या प्रकरणात राज्यातील भाजप नेते मूग गिळून गप्प का आहेत असा सवालही त्यांनी केला आहे.