नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये नवीन राजकीय वादाला तोंड फुटले आहे त्याचे कारण आहे तृणमूल काँग्रेसच्या आमदाराच्या पत्नीने एक कोटी रुपयांची लॉटरी जिंकल्यामुळे हा वाद निर्माण झाला आहे. ही लॉटरी जिंकल्यानंतर विरोधकांनी सत्ताधारी पक्षावर मनी लाँडरिंगचे गंभीर आरोप केले आहेत. कारण गेल्या काही महिन्यांमध्ये दुसऱ्यांदा ‘टीएमसी’शी संबंधित व्यक्तीला एक कोटी रुपयांची लॉटरी लागली आहे. दरम्यान, टीएमसीने सर्व आरोप फेटाळून लावत भाजपावर पलटवार केला आहे.
जोरसांकोचे आमदार विवेक गुप्ता यांच्या पत्नी रुचिका गुप्ता यांनी ३१ ऑगस्ट रोजी नागालँड सरकारकडून काढलेल्या लॉटरीत पहिले पारितोषिक जिंकले आहे. नागालँड सरकारकडून सिक्कीम, नागालँड आणि पश्चिम बंगाल या तीन राज्यांत “डीअर गव्हर्नमेंट लॉटरी” चालवली जाते. यामध्ये टीएमसी आमदार विवेक गुप्ता यांच्या पत्नी रुचिका गुप्ता यांना ही लॉटरी लागली आहे.
Off & on, I’ve been vocal about this alarming issue.
The poor people of WB are being lured by the prospect of winning easy money & are becoming addicted. With easy access, they’re draining their hard earned money on such tickets & corrupt TMC leaders are gaining at their expense. pic.twitter.com/bLstiJPBJy— Suvendu Adhikari • শুভেন্দু অধিকারী (@SuvenduWB) October 27, 2022
दरम्यान, रुचिका यांनी लॉटरी जिंकल्यानंतर पश्चिम बंगालचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी गुरुवारी याबाबत ट्वीट केले. संबंधित ट्वीटमधून त्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे पुतणे व टीएमसी खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यावर हल्लाबोल केला. “मी आधीपासून म्हणत होतो की, ‘डीअर लॉटरी’ आणि टीएमसीचं अंतर्गत लागेबंध आहेत. सामान्यांकडून पैसे उकळण्याचा हा सोपा मार्ग आहे. सामान्य लोक लॉटरीचं तिकीट खरेदी करतात, पण टीएमसी नेते बंपर बक्षिसे जिंकतात. आधी अनुब्रता मंडल यांनी एक कोटींची लॉटरी जिंकली आता टीएमसी आमदार विवेक गुप्ता यांच्या पत्नीनं बाजी मारली” असे ट्वीट अधिकारी यांनी केले.
“डीअर गव्हर्नमेंट लॉटरी” नावाने लॉटरी चालवणाऱ्या कंपनीने अलीकडेच वृत्तपत्रातील जाहिरातीत विजेत्यांची नावे जाहीर केली. त्यानुसार, रुचिका गुप्ता यांनी एक कोटींचे बक्षीस जिंकले. तथापि, डिसेंबर २०२१ मध्ये, टीएमसीचे वीरभूमचे जिल्हाध्यक्ष अनुब्रता मंडल यांनीही त्याच लॉटरीत एक कोटी रुपये जिंकले होते. याबाबतचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मंडल यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. ते सध्या जनावरं तस्करी प्रकरणात न्यायालयीन कोठडीत आहेत. या प्रकारानंतर संबंधित लॉटरी कंपनी आणि टीएमसी नेते ईडीच्या रडावर असल्याची माहिती सूत्रांनी दिली. याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नाही.