नवी दिल्ली – भारत जोडो यात्रेत काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या सुरक्षेतील हलगर्जीपणा झाल्याचे समोर आले आहे. होशियारपूरमध्ये भारत जोडो यात्रेदरम्यान एका व्यक्तीने काँग्रेस खासदार राहुल गांधींना मिठी मारण्यासाठी सुरक्षा रक्षकांचा घेरा तोडल्याचे पाहायला मिळाले.या प्रकारामुळे राहुल गांधी यांच्या सुराक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मंगळवारी होशियारपूर येथून भारत जोडो यात्रेला सुरुवात झाली. यादरम्यान राहुल गांधींच्या सुरक्षेत त्रुटी आढळून आली. एका व्यक्तीने सिक्युरिटी कॉर्डन तोडून थेट राहुल गांधींना मिठी मारली.कोणाला काही समजण्याआधीच अगदी क्षणात हा सर्व प्रकार घडला. त्यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्या तरुणाला तात्काळ मागे खेचत बाजूला नेले. याचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे.
याबाबतचा व्व्हीडीओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर देखील राहुल गांधींच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले. अशात पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष राजा वाडिंग यांनी सांगितले की, राहुल गांधींचे चाहते असलेल्या तरुणाने उत्साहात त्यांना मिठी मारली. यामध्ये सुरक्षेची कमतरता असू शकत नाही.पंजाबमध्ये भारत जोडो यात्रेला पाच दिवस उलटल्यानंतर सोमवारी राहुल गांधींनी मुख्यमंत्री मान यांच्यावर निशाणा साधला होता.
#WATCH | Punjab: A man tried to hug Congress MP Rahul Gandhi, during Bharat Jodo Yatra in Hoshiarpur, was later pulled away by workers.
(Source: Congress social media) pic.twitter.com/aybyojZ1ps
— ANI (@ANI) January 17, 2023
भारत जोडो यात्रेद्वारे राहुल गांधी संपूर्ण देश भ्रमण करून विविध राज्यात संघटना मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशात अनेकदा ते सत्ताधारी भाजपवर निशाणा साधताना दिसून येतात. पंजाबमधून यात्रा जात असताना त्यांनी दिल्लीत शेतकरी आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांना ज्या व्यथांचा सामना करावा लागला त्याबाबत भाष्य केले.