रिलायन्स कम्युनिकेशन्सला 104 कोटी रूपये परत देण्याचा आदेश
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला मोठा झटका दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारची याचिका फेटाळत रिलायन्स कम्युनिकेशन्सला 104 कोटी रूपये परत करण्याचे आदेश दिले आहेत. हे प्रकरण स्पेक्ट्रमच्या थकबाकीशी निगडित आहे.
Supreme Court today ordered the Centre to refund around Rs 104 crores to Anil Ambani-led Reliance Communications.
This amount is the balance of the bank guarantee for spectrum, to be paid to R-Com by Centre. (file pic) pic.twitter.com/e4ta4zeZte— ANI (@ANI) January 7, 2020
केंद्र सरकारने रिलायन्स कम्युनिकेशन्स विरोधात एक याचिका दाखल केली होती. या याचिकेद्वारे टेलिकॉम डिसप्युट अँड अपिलेट ट्रिब्युनलच्या (टीडीसॅट) निर्णयाला आव्हान देण्यात आले होते. ट्रिब्युनलने रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या बाजूने निर्णय देत केंद्र सरकारला कंपनीला 104 कोटी रूपये परत करण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, या प्रकरणी न्यायमूर्ती रोहिंटन नरिमन यांच्या खंडपीठापुढे सुनावणी पार पडली. या खंडपीठाने ट्रिब्युनलचा निर्णय कायम ठेवला आहे.
कर्जाच्या ओझ्याखाली असलेल्या अनिल अंबानी यांच्यासाठी गेल्या तीन महिन्यांमधली ही तिसरी चांगली बातमी आहे. दामोदर वॅलीविरोधातील एका प्रकरणाचाही निकालही रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्याच बाजूने लागला होता. यापूर्वी ब्रिटनच्या न्यायालयाने अनिल अंबानी यांच्या आरकॉमविरोधातील इंडस्ट्रिअल अँड कमर्शिअल बॅंक ऑउ चायना, चायना डेव्हलपमेंट बॅंक आणि एक्सपोर्ट-इंपोर्ट बॅंक ऑफ चायना यांची याचिका फेटाळली होती.