अमिताभ बच्चन यांनी करोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान एक आशादायक मेसेज पोस्ट केला आहे. सर्व देशवासीयांना करोनाच्या विरोधात एकत्र लढण्याचे अपील त्यांनी केले आहे. त्यांनी वडील हरिवंशराय बच्चन यांची “होप’ नामाची एक कविता ऐकवली आहे. “होप कोई स्ट्रॅटेजी नहीं है’ असे यांनी म्हटले आहे.
आशा ही एक सुरुवात असते आणि आशेच्या आधारित आपण प्रगती करतो. पण आपण आशा या शब्दाचा मूळ अर्थ विसरून जातो. आशा हीच आपल्या सर्व कामांना दिशा देते. दररोज आपण अनेकांची मदत करत असतो. दररोज आपण लोकांच्या साहसी आणि परोपकारी वृत्तीचे गुणगान करत असतो.
दररोज अंधकार हटून उजेड येत असतो. कारण लोक एकमेकांबरोबर राहण्याचा पर्याय निवडत असतात, आपण लढू आणि विजयी होऊ असे म्हणून बिग बी यांनी ही कविता समाप्त केली. करोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान सर्व जण हताश व्हायला लागले असताना, हरिवंशराय बच्चन यांच्या या कवितेतून फ्रंटलाईन वर्कर्सच्या कामाचे कौतुक करून आशादायक विचार कायम ठेवण्याच्या या व्हिडिओचे खूप कौतुक होते आहे. लोकांच्या मनात आशा जागवण्याचे काम बच्चन यांनी केले आहे.