वलाना गावचा अनोखा आदर्श
हिंगोली (शिवशंकर निरगुडे) : ग्रामपंचायत निवडणूक राजकारणाचा पाया मानला जातो. ग्रामपंचायतच्या निवडणुकीत बऱ्याच नेत्यांची राजकीय कारकीर्द ग्रामपंचायत पासून सुरू होते. असाच एक उच्चशिक्षित एक तरुण ग्रामपंचायतचा सरपंच झाला आहे. ग्रामपंचायतीचा एक छोट्या वलाना गावातील एक अनोखा आदर्श ठरलाय. गावच्या विकासाची सूत्र उच्च शिक्षित तळमळ असलेल्या डॉक्टरच्या हातात दिली.
नुकत्याच तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या निवडणुका पार पडल्या त्याचे निकालही हाती आले. त्यातच जिल्हाच लक्ष लागून असलेल्या सेनगाव तालुक्यातील वलाना गावातील निवडणूक विशेष ठरली. वलाना ग्रामपंचायतीसाठी झालेली लढत काही चुरशीची ठरली असून कारण या ठिकाणी सरपंच पदाच्या निवडणुकीत संजय वाकोडे यांच्याविरोधात उच्चशिक्षित डॉ देवानंद गोरे हे रिंगणात होते. त्यामुळे वाकोडे विरुद्ध गोरे या लढतीत कोण बाजी कोण मारणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. दरम्यान या ग्रामपंचायत निवडणुकीच्या अंतिम लढतीत सार्वजनिक ग्रामविकास पॅनेलचे सरपंचपदाचे उमेदवार डॉ देवानंद गोरे व तसेच श्री संत गजानन महाराज ग्रामविकास पॅनेलचे संजय वाकोडे यांना 178 मतांनी पराभूत केले संजय वाकोडे हे राजकारणातील ४० वर्षांपासून अनूभवी नेते असून ते पंचायत समिती सदस्य व सरपंच सूद्धा राहिले होते त्यामुळे या निकालाची परिसरात जोरदार जास्त चर्चा पाहायला मिळाली.
गोरे हे उच्चशिक्षित तरूण असले तरी गावातील मूलभूत समस्येच्या उडालेल्या बोजवार्यामूळे गावची भ्रमनिरास पाहता गाव विकासापासून वंचित पाणी, रस्ते, विज, आरोग्य,या मूलभूत सूविधापासून वंचित गावाची अवस्था पाहून ही तळमळ असलेला डॉ. देवानंद गोरे यांनी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आणि थेट सरपंच पदी विराजमान झाले. गावगाडा हाकायला उच्चशिक्षित सरपंच म्हणून गावकऱ्यांनी कौल दिला.
डॉ देवानंद गोरे यांचे पहिली ते सातवी वलाना तर सातवी ते १० पानकनेरगांव येथे शिक्षण घेऊन रिसोड आदर्श काॅलेज व १२ नंतर बीए एम एस महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ नाशिक मधून पदवी संपन्न केली. मूंबई, पूणे, नांदेड सारख्या ठिकाणी वैद्यकीय क्षेत्रातील अनूभव घेतल्यानंतर पानकनेरगांव येथे शंकरपर्वती क्लिनीकच्या माध्यमातून सेवा सूरू केली व त्यानंतर त्यांनी गावचा विकास करण्यासाठी कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना गावातील सामान्य जनतेनी डॉ गोरे यांना गावचे नेतृत्व हातात दिले.
डॉ. गोरे हे उच्चशिक्षीत असले तरी गावावरील त्यांचा स्नेह स्वस्थ बसू देत नव्हता आणि ३००० लोकवस्तीच्या गावात सरपंच म्हणून विजयी झाले. अनेक वर्षापासून ग्रामपंचायत मधील सत्तेत असलेले लोक उंटावरून शेळ्या हाकायचे अशी परिस्थिती होती संदरील ह्या लोकांना सत्तेतून खाली उतरत जनतेनी जागा दाखवून दिली आणि उच्चशिक्षित असलेल्या तरूणाला सरपंच पदावर बसवले.गावकऱ्यांनी डॉ. देवानंद गोरे हे सरपंच म्हणून स्वीकारले असले तरी आपल्या शिक्षणाचा कितपत उपयोग गावाच्या विकासासाठी करतो ते येणारा काळच ठरवणार आहे