मुंबई – आशिया करंडक स्पर्धेत परंपरागत प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय व्होल्टेज सामना येत्या 28 ऑगस्टला होणार आहे. दोन्ही देशांचे क्रिकेट चाहते या सामन्यासाठी खूप उत्सुक असतात. या सामन्याच्या तिकिटांची विक्री 15 ऑगस्टपासून सुरू झाली आणि अवघ्या काही वेळातच पहिल्या गटवारीची सर्व तिकिटे विकली गेली.
आशिया करंडक स्पर्धा मूळ वेळापत्रकानूसार श्रीलंकेत होणार होता. पण तेथील राजकीय अस्थिरतेमुळे ही स्पर्धा आता अमिरातीत होणार आहे. ही स्पर्धा 27 ऑगस्ट ते 11 सप्टेंबरदरम्यान खेळवली जाणार आहे. तिकिटांची मागणी खूप आहे. काही तासांतच भारत-पाकिस्तान सामन्याची तिकिटे विकली गेली. आयोजक लवकरच तिकिटांचा दुसरा भाग उपलब्ध करून दिला जाणार आहे.
या स्पर्धेतील सामन्यांच्या तिकिटांची विक्रीही सुरू झाली आहे. दुबईत होणाऱ्यास भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्याबद्दल क्रिकेट चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आहे, त्यामुळे तिकीट विक्रीला मोठा प्रतिसाद मिळाला. मागणी जास्त असल्याने कंपनीने प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर तिकिटांची विक्री केली.
दुबई आणि शारजाहमधील सामन्यांसाठी स्वतंत्र ऑनलाइन लिंक जारी करण्यात आल्या होत्या. भारत व पाकिस्तान सामन्याच्या तिकिटांसाठी चाहते 6 वाजल्यापासून वेबसाइटवर ऑनलाइन आले व काही वेळातच ही वेबसाइट क्रॅश झाली होती.