सोरतापवाडी – नायगावचे पोलीस पाटील दत्तात्रय चौधरी यांनी पुरग्रस्तांना मदत मिळावी, असे आवाहन करताच गावातून मदतीचा ओघ सुरु झाला आहे. माजी सरपंच महादेव चौधरी यांच्या पुढाकारातून गावाने भाकरी, लोणचे, चटणी, पाण्याच्या बाटल्या, बिस्कीटचे पुडे आदी खाद्यन्न जमवून पुरग्रस्तांना पाठविले आहे.
नैसर्गिक संकटांना तोंड देण्यासाठी नायगाव पेठ येथील नागरिक मदत करीत असल्याचे पोलीस पाटील चौधरी यांनी सांगितले. हे कार्य पुढील आठवडाभर तरी सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले, गटतट विसरून तसेच सर्व पक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते एकत्र येत असल्याचेही चौधरी यांनी सांगितले.