नवी दिल्ली: आसामच्या आगामी विधानसभा निवडणुका होत आहेत. त्यामुळे देशातील राजकारण चांगलेच तापले आहे. सध्या काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे आसामच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी एका प्रचारसभेत त्यांनी केंद्र सरकारसोबतच आरएसएसवर देखील सडकून टीका केली आहे. “नागपूरमध्ये जन्म झालेली एक ताकद संपूर्ण देशावर नियंत्रण प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे” अशा शब्दांत राहुल गांधी यांनी आरएसएसला सणसणीत टोला लगावला आहे.
You think democracy is declining. Youth is unemployed, farmers are protesting, CAA is there. We can't ask the people of Assam to forget their culture, language if they come to Delhi. One force,born in Nagpur, trying to control the whole country: Rahul Gandhi in Dibrugarh, Assam pic.twitter.com/W1Txo035Bv
— ANI (@ANI) March 19, 2021
राहुल गांधी “देशात लोकशाहीचे पतन होत आहे. तरुण बेरोजगार आहेत. शेतकरी आंदोलन करत आहेत. सीएए सुद्धा आहे. आसामची जनता दिल्लीत आल्यानंतर त्यांनी त्यांची संस्कृती, भाषा बदलावी, अशी आपण अपेक्षा ठेऊ शकत नाही. नागपूरमध्ये जन्म झालेली एक ताकद संपूर्ण देशावर नियंत्रण प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे” असं म्हणत हल्लाबोल केला आहे. 27 मार्च रोजी आसाममध्ये पहिल्या टप्प्यासाठी मतदान होणार असून दुसऱ्या टप्प्यासाठी 1 एप्रिल तर तिसऱ्या टप्प्यासाठी 6 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तर 2 मे रोजी निवडणुकांचा निकाल लागणार आहे.
राहुल गांधी यांनी आसामच्या जनतेला पाच आश्वासने दिली आहेत. “भाजपाने आसामच्या चहाच्या मळ्यातल्या मजुरांना 351 रुपये रोज देण्याचं आश्वासन दिलं. पण प्रत्यक्षात 167 रुपयेच दिले जातात. पण मी नरेंद्र मोदी नाही, मी फसवणार नाही. आज मी तुम्हाला 5 गोष्टींची खात्री देतो. चहाच्या मळ्यातल्या मजुरांसाठी 365 रुपयांचा दर, सीएएला विरोध, राज्यात 5 लाख रोजगाराच्या संधी, 200 युनिटपर्यंत मोफत वीज आणि प्रत्येक गृहिणीसाठी 2000 रुपये” असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.