नवी दिल्ली : भारतीय रेल्वेत मिळणाऱ्या बिर्याणीमध्ये कोळी आल्याची तक्रार एका प्रवाशाने केली आहे. या प्रवाशाने रेल्वे मंत्रालयाला ट्वीट करून या प्रकरणी तक्रार केली आहे. या तक्रारीबद्दल खेद व्यक्त करताना रेल्वेने प्रवाशांकडून पीएनआर आणि इतर तपशील मागविला आहे.
शुक्रवारी शेषाद्री एक्स्प्रेसमध्ये बिर्याणीमध्ये कोळीचे प्रकरण उघडकीस आले. मितेश सुराणा नावाच्या प्रवाशाने बिर्याणीत कोळ्याचे फोटो ट्विट करुन रेल्वे मंत्रालयाकडे तक्रार केली. या तक्रारीनंतर सुमारे 10 मिनिटांनी रेल्वे मंत्रालयाने घडलेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली.