नवी दिल्ली : दिल्लीच्या हरी नगर भागातील चप्पल कारखान्याला शनिवारी सायंकाळी आग लागली.
या आगीचे स्वरूप रौद्र होते. दुपारी पाच वाजून दोन मिनिटांनीही आग लागल्याचा दूरध्वनी आला. त्यानंतर घटना स्थळावर अग्नीशामक दलाचे 20 बंब पाठवण्यात आले. मायापूरी फेज दोन मध्ये लागलेल्या आघीच्या ठिकाणी रात्री उशीरापर्यमत बचाव कार्य चालू होते, असे दिल्लीचे अग्नीशामक दलाचे प्रमूख अतूल गर्ग यांनी सांगितले.
डिसेंबर 23 रोजी अनाज मंडी भागात लागलेल्या भीषण आगीत होरपळून नऊ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर निवासी भागात असणाऱ्या कारखान्यांच्या सुरक्षिततेविषयी प्रश्नचिन्ह उभे झाले आहे.