कोची (केरळ) : कठोर परिश्रम करणाऱ्या नरेंद्र मोदी यांच्या विरोधात भारतीय राजकारणात राहूल गांधी यांना काहीच स्थान नाही. त्यांना संसदेत निवडून केरळने घोडचूक केली आहे, असे मत इतिहास तज्ज्ञ रामचंद्र गुहा यांनी व्यक्त केले.
स्वातंत्र्य लढ्यातील महान पक्ष ते दयनीय अवस्थेतील पारंपरिक व्यवसाय अशी कॉंग्रेसची झालेली वाटचाल ही हिंदुत्व आणि अंध राष्ट्रभक्तीचा देशात प्रभाव निर्माण होण्याचे एक कारण आहे, असे गुहा म्हणाले. व्यक्तीगत पातळीवर आम्ही राहूल गांधी यांचय विरोधात नाही. ते एक सज्जन गृहस्थ आहेत. उत्तम संस्कारीत आहेत. मात्र देशाच्या तरूण पिढीला राजघराण्याची पाचवी पिढी नको आहे. जर मल्याळी लोकांना 2024 मध्ये पुन्हा राहूल गांधी यांना विजयी केले तर तो नरेंद्र मोदी यांना सहाय्य करणारे ठरेल, असेही गुहा म्हणाले. देशभक्ती विरूध्द अंधराष्ट्रभक्त या विषयावरील केरळ साहित्य महोत्सवात गुहा बोलत होते.
केरळी लोकांनी भरून वाहणाऱ्या मंडपात गुहा म्हणाले, केरळ तुम्ही देशासाठी अनेक दिव्य गोष्टी केल्या आहेत. मात्र राहुल गांधी यांना संसदेत पाठवून तुम्ही घोडचूक केली आहे.
नरेंद्र मोदी यांचा सर्वात मोठा गूण म्हणजे ते राहूल गांधी नाहीत. त्यांनी स्वत:ला घडवले आहे. त्यांनी राज्य 15 वर्ष चालवले. त्यांना प्रशासकीय अनुभव आहे. ते अविश्वासनीय वाटावे इतके कठोर परिश्रम घेणारे आहेत. युरोपमध्ये ते कधीही सुटीसाठी जात नाहीत. पण जर राहूल गांधी हे अधिक हुषार असते, अधिक परिश्रम घेणारे असते, युरोपमध्ये कधीही सुटीवर जाणारे नसते तरी राजवंशातील पाचवी पिढी हा त्यांच्यासाठी दूर्गूणच ठरला असता, असे ते म्हणाले.
भारत हा अधिक लोकशाहीवादी बनत आहे, संरजामशाही पासून दूर जात आहे. त्याचे गांधी घराण्याला आकलन होत नाही.तुम्ही (सोनीया) दिल्लीत असता. तुमचे साम्राज्य आक्रसत आहे. मात्र तुमचे तुमचे चमचे तुम्हाला सांगत असतात तुम्हीच बादशहा आहात, असे ते म्हणाले.
राहुल गांधी असल्यामुळेच मोदी नेहमी सांगू शकतात नेहरूंनी काश्मिारात हे केले. चीनमध्ये हे केले. राहुल गांधी समोर नसतील तर त्यांना आपल्या धोरणाबाबत बोलावे लागेल. ते का अपयशी ठरले हे सांगावे लागेल, असेही ते म्हणाले.
शेजारील देशात वाढलेल्या इस्लामी मुलतत्ववादामुळे देशात अलीकडे हिंदुत्वाचा प्रसार झाला. अंधराष्ट्रभक्ती ही जगात सगळीकडे फोफावत आहे. या कारणामुळेच देशात ही अवस्था आहे, असे ते म्हणाले.
इतिहासकार विल्यम डालरीप्ले, कादंर्बीकार बेन्यामीन, नमिता गोखले, चेतन भगत आणि पत्रकार करण थापर, राजदीप सरदेसाई हे अन्य मान्यावर या परिसंवादात सहभगी झाले होते.