पवार कुटुंबियांची तिसरी पिढी सध्या राजकारण व समाजकारणात सक्रीय झाली आहे. पार्थदादा पवार यांच्या रुपाने पिंपरी-चिंचवड शहराला एक युवा नेतृत्व मिळाले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये एक नवे चैतन्य निर्माण झाले आहे. पार्थ पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याबाबत पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्याशी केलेली खास बातचीत.
1) पवार कुटुंबियांशी तुमचा एक वेगळा सलोखा आहे, त्यांची तिसरी पिढी राजकारणात आहे. काय सांगाल ?
- पिंपरी चिंचवड शहराच्या बाबतीत बोलायचे झाले तर आदरणीय शरद पवार साहेबांनी पिंपरी चिंचवड शहराचा पाया रचला. अजितदादा पवार यांनी शहराचा विस्तार केला. तर भविष्यामध्ये या शहराच्या विकासकामांच्या माध्यमातून पार्थदादा पवार शहराला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतील.
त्यांच्यामध्ये एक वेगळा गुण आहे. तो म्हणजे कमी बोलणे आणि जास्त काम करणे. याचाच फायदा त्यांना राजकारणात होणार आहे. त्यांची काम करण्याची हातोटी चांगली आहे. कोणतेही काम केले तरी त्यांना प्रसिद्धीची हाव अजिबात नाही. समाजकारणामध्ये हा गुण अत्यंत महत्त्वाचा असतो.
2) सामाजिक कार्यामध्ये त्यांनी स्वतःला कसे झोकून दिले आहे?
- गोर-गरीबांची मदत करण्यासाठी पार्थदादा कायम तत्पर असतात. गेल्या वर्षभरापासून करोनाच्या पार्श्वभूमीव त्यांचे शहरात काम सुरू आहे. लॉकडाऊनच्या काळात दररोज पाच हजार जणांना त्यांनी अन्नदान केले आहे. त्यासोबतच मास्क, सॅनिटायजरचे वाटप केले.
विविध ठिकाणी आरोग्य शिबिर घेण्यासाठी त्यांची धडपड सुरू असते. तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत त्यांनी अनेक शिबिरे घेतली आहेत. पार्थ पवार फाउंडेशनच्या माध्यमातून गरीब विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणासाठी इंटरनेट डिव्हाइसचे वाटप केले आहे.
3) पार्थ पवार यांच्याबाबत युवकांमध्ये काय भावना आहेत?
- युवकांच्या मनातील भावना ओळखून त्यांच्या कलेने काम करण्याची सवय पार्थदादांना आहे. त्यांच्या राजकारणातील सक्रियतेमुळे मावळ, पिंपरी चिंचवड मधील तरुणांमध्ये एक नवचैतन्य आलं आहे. मदतीच्या हाकेला ओ देणारा माणूस म्हणून त्यांची जनमानसात ओळख झालीआहे. लहानग्या पोरापासून ते वृद्ध माणसांपर्यंत सर्वांना पार्थदादा आपल्या घरातील माणूस वाटतो यातच त्यांचे खूप मोठे यश आहे.
4) त्यांचे वडील अजित पवार यांच्या नावाला एक मोठे वलय आहे, त्यांच्याकडून पार्थदादा यांनी कोणता गुण घेतल्याचे तुम्हाला जाणवते?
- आदरणीय अजितदादा पवार यांची एक सवय आहे. त्यांच्याकडे मदत मागण्यासाठी जी व्यक्ती जाते, तिला ते कधीच रिकाम्या हाताने परत पाठवत नाहीत. एखादे काम घेऊन आलेल्या व्यक्तीला ते त्याचक्षणी काम होणार किंवा नाही ते सांगतात. नेमका तसाच स्वभाव पार्थदादांचा आहे. त्यांच्याकडे कोणतेही काम घेऊन एखादा गरजू माणूस गेला तर तो रिकाम्या हाताने कधी परत येत नाही. पार्थदादा भविष्यातील एक मोठे नेतृत्व आहे. त्यांच्याकडून युवापिढीने शिकण्यासारखे खूप काही आहेत.
युवा कार्यकर्त्यांना घेऊन एक मोठी फळी त्यांनी निर्माण केली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील असंख्य कार्यकर्ते त्यांच्यापाठी पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. भविष्यामध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली एक वेगळी लाट येणार यामध्ये तिळमात्र शंका नाही. आपले आजोबा आणि वडील यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांनी समाजकारणातून राजकारणाचा रस्ता धरला आहे. यातून ते गरुडभरारी नक्कीच घेतील. त्यांना वाढदिवसानिमित्त कोटी कोटी शुभेच्छा….!