मुंबई – भारतात करोनाची तिसरी लाट आल्याचे स्पष्ट झाल्यावर यंदाच्या आयपीएल स्पर्धेवरही करोनाचे सावट निर्माण झाले आहे. अशा स्थितीत संपूर्ण स्पर्धाच देशाबाहेर पुन्हा एकदा अमिरातीत हलवली जाणार का याबाबत लवकरच निर्णय जाहीर केला जाणार असल्याचे संकेत बीसीसीआयने दिले आहेत.
गेल्या वर्षी या स्पर्धेचा पहिला टप्पा भारतात घेतला गेला होता. मात्र, धोका वाढत गेल्यामुळे दुसरा टप्पा अमिरातीत हलवण्यात आला होता. मात्र, आयपीएल स्पर्धा जाहीर झाल्यावर सर्व सामने भारतातच होणार असेच निश्चित करण्यात आले होते. मात्र, नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच करोनाच्या तिसऱ्या लाटेने पुन्हा एकदा मोठा धोका निर्माण झाला आहे.
अन्य काही पर्याय
– होम व अवे धर्तीवर ज्या संघांचे स्वतःचे मैदान आहे तिथेच अन्य संघ सामना खेळतील.
– ज्या शहरात एकापेक्षा जास्त मैदाने आहेत तीथेही सामने आयोजित करता येतील.
– स्पर्धा 2 एप्रिलच्या जागी 25 मार्चपासून शक्य
– डबल हेडर सामन्यांच्या संख्येत कपात
– अमिराती हा अखेरचा पर्याय