केंद्रीय अर्थसंकल्पात दूरदृष्टीचा पूर्ण अभाव आहे. खरेतर, दूरदृष्टीच गायब आहे. पेट्रोल आणि डिझेलवरील करांत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे त्या इंधनांचे दर वाढणार आहेत. त्यातून वाहतूक ते बाजार ते स्वयंपाकघर असा महागाईचा फटका बसेल. जनसामान्यांच्या यातनांमध्ये वाढच होत आहे.