हिंगोली – राज्यात महाविकास आघाडीचे सरकार जाऊन शिंदे फडणवीस सरकार आले.आता हे सरकार येऊन सहा महिन्याहून अधिक कालावधी पार पडला आहे. तरीही अद्याप सरकारने मंत्रिमंडळ विस्तार केलेला नाही. यावरूनच आता राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. नऊ महिन्यात तर बाळ जन्माला येत मात्र यांना साधा मंत्रिमंडळ विस्तार करता आला नाही अशी टोलेबाजी अजित पवार यांनी केली. हिंगोली येथील सभेत बोलताना अजित पवारांनी ही टीका केली.
येणाऱ्या काळात लोकसभा निवडणूकित महाविकास आघाडीचाच खासदार झाला पाहिजेत. 50 खोके आणि त्यांना एकदम ओके करा असंही अजित पवार यावेळी म्हणाले. मंत्रिमंडळाबाबत बोलताना पवार म्हणाले,”मंत्रिमंडळात एकाही महिलेला स्थान देण्यात आलेले नाही. राज्यात कर्तृत्वान महिला नाही का ? असा सवाल उपस्थित करत नऊ महिन्यात तर बाळ जन्माला येते यांना साधा मंत्रिमंडळ विस्तार करता येत नाही” असा टोला अजित पवार यांनी लगावला.
हे जसे घटनाबाह्य सरकार आहे तसेच स्थगिती सरकार देखील आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात आम्ही जी कामे मंजूर केली त्या कामांना या सरकारने स्थगिती दिल्याचे देखील पवार यांनी यावेळी सांगितले. तसेच हे सरकार राज्यात आल्यापासून कायदा सुव्यवस्थेची वाट लागली आहे अशी टीका अजित पवार यांनी यावेळी केली.