चिंबळीतील स्थिती : सर्रासपणे वाहतूक सुरू
चिंबळी -येथील इंद्रायणी नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधारा वाहतुकीसाठी नसतानाही या बंधाऱ्यावरून सर्रासपणे वाहतूक सुरू असून बंधाऱ्याच्या दुतर्फा लोखंडी कठडे नसल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
महाराष्ट्र शासनाचे वतीने या ठिकाणी 37 वर्षांपूर्वी बंधारा उभरण्यात आला आहे. या बंधाऱ्यामुळे येथील शेती जलसिंचनाला पाणी उपलब्ध झाले असून त्यामुळे शेती व्यवसाय समृद्ध झाला आहे; मात्र काही वर्षांपूर्वी या भागात औद्योगिकीकरण झाले असून रोजगाराच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात कामगार या ठिकाणी असलेल्या लोकसंख्या वाढली आहे. नदीच्या दक्षिण बाजूला मोशी असून ती पिंपरी-चिंचवड महानगर पालिका हद्दीत आहे.
उत्तरेकडे नदीपलीकडील चिंबळी गाव आहे. या दोन्ही गावांना जोडणारा हा बंधारा असून या बंधाऱ्यावरून मोठ्या प्रमाणात नागरिक ये-जा करत असतात नोकरी, शिक्षणासाठी मोशीला येण्यासाठी चिंबळी येथील नागरिक या बंधाऱ्याचा दिवसरात्र वापर करत असतात. मुळात हा बंधारा वाहतुकीसाठी नुसन पाणी साठवणुकीसाठी आहे; परंतु यावर दहा फूट सिमेंट रस्ता असल्याने बंधारा बांधल्यापासून यावरून वाहतूक होत आहे.
दोन गावांना कमी वेळात जोडणारा आणि वेळेची बचत करणारा मार्ग म्हणून या रस्त्याची निवड वाहनचालक-पादचारी करतात. रस्ता दहा फुटी व दोन्ही बाजूला खोल नदी असा हा धोकादायक रस्ता आहे. पूर्वी वाहतूक कमी असल्याने बंधारा ओलांडणे सोप्पे होते; परंतु आता वाहतूक अधिक असून दोन्ही बाजूने वाहने येत असल्याने एखादे वाहन घसरून अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बंधाऱ्यावर लोखंडी कठडे उभारल्यास पादचाऱ्यांना चालणे व वाहनचालकांना वाहने चालविणे सुरक्षित होणार आहे. त्यामुळे एकतर वाहतूक बंद करा.