सातारा – आजी – माजी सैनिकांचा आदर करतानाच त्यांना विविध सोयी सुविधा मिळव्ून देण्यासिाठी उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातत्याने सकारात्मरक भूमिका घेतली आहे.
370 कलम रद्द करण्यापसह वन रॅंक – वन पेन्शनचा विषय भाजप सरकारनेच मार्गी लावला आहे, त्यामुळे सर्व आजी माजी सैनिक व त्यांचे कुटुंबिय महायुतीच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील आणि निवडणुकीची “ऑपरेशन विजय मोहिम’ फत्ते होणारच, असे प्रतिपादन सैनिक सहकारी बॅंकेचे चेअरमन आणि महाराष्ट्र राज्य पेन्शनर संघटनेचे अध्यक्ष कॅप्टन उदाजीराव निकम यांनी केले आहे.
माजी सैनिक मेळाव्यात ते बोलत होते. सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील भाजप उमेदवार उदयनराजे भोसले आणि सातारा विधानसभेचे उमेदवार शिवेंद्रसिंहराजे भोसले, समृध्दी जाधव यांच्यासह माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी उदयनराजे भोसले म्हणाले, भाजप सरकारच्या माध्यमातून वन रॅंक- वन पेन्शन आणि 370 कलम रद्द करण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे सैनिकांची भूमी असलेल्या सातारा जिल्ह्यातूनही समाधान व्यक्त होत आहे. सैनिकांची शक्ती सदैव आमच्या पाठीशी उभी करण्याचा सैनिक संघटनेने घेतलेला निर्णय आमचे बळ वाढविणारा आहे.
शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, सैनिक व त्यांच्या कुटुंबियांच्या विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. या मेळाव्यांच्या निमित्ताने सैनिकांनी आम्हास निवडणुकीत दिलेला पाठिंबा नव्या क्रांतीपर्वाची सुरूवात आहे. सैनिकांसाठीची वन रॅंक- वन पेन्शतन ही संकल्पपना प्रत्यक्षात आणण्यासाठी भाजप सरकारने घेतलेली भूमिका आणि काश्मिरबाबतचा 370 कलम रद्द करण्याचा निर्णय सैनिकांच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचा आहे.
सैनिकांचा पाठिंबा देशाला नवी दिशा दिल्याशिवाय राहाणार नाही. प्रारंभी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आली. माजी उपनगराध्यक्ष व माजी सैनिक शंकर माळवदे यांनी प्रस्तापविक व सूत्रसंचालन केले. माजी सैनिक संघटनेचे सतीश गुरव, निवास नलवडे, जयवंत गुरव यांनी मान्य्वरांचे स्वागत केले. बाळासाहेब लडकत, अरूण घाडगे, सतीश शिर्के, प्रकाश पवार, मोहन चव्हाण, रफिक इनामदार, धनाजी माने आदींसह जिल्ह्यातील प्रमुख आजी – माजी सैनिक व त्यांचे कुटुंबिय मोठ्या संख्येधने उपस्थित होते.