नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नव्या संसद भवनाच्या छतावर लावल्या जाणाऱ्या कास्य धातुच्या साडेसहा मीटर उंचीच्या नवीन राष्ट्रचिन्हाचे अनावरण केले आहे. त्यावरूनही आता मोठे वादंग निर्माण झाले आहे. मूळ राष्ट्रचिन्हात “सत्यमेव जयते” हे वाक्य आहे, ते वाक्य या नवीन चिन्हात गाळून टाकल्याचा एक आक्षेप आहे. तसेच या राष्ट्रचिन्हाच्या अनावरणप्रसंगी विरोधी पक्ष नेत्यांना आमंत्रित करण्याची गरज असताना पंतप्रधानांनी केवळ एकट्यानेच त्याचे अनावरण केले त्यावरही काहींचा आक्षेप आहे. तर काहींच्या मते नवीन चिन्ह मूळ चिन्हाशी नीट जुळत नाही.
आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी ट्विटरवर प्रश्न उपस्थित केला आहे की, मी 130 भारतीयांना विचारू इच्छितो की राष्ट्रचिन्हात बदल करणाऱ्यांना तुम्ही देशद्रोही म्हणून संबोधणार की नाही. तृणमुलच्या खासदार महुओ मोईत्रा यांनी ट्विटरवर जूना अशोक स्तंभ आणि मोदींनी अनावरण केलेला अशोक स्तंभ ही दोन्ही चित्रे शेजारी-शेजारी टाकून ती प्रकाशित केली आहेत.
कॉंग्रेसने म्हटले आहे की, नवीन राष्ट्रचिन्हात “सत्त्यमेव जयते” हे ब्रीद वाक्य न टाकणे ही सरकारने केलेली मोठी चूक आहे. या अनावरणाच्या कार्यक्रमासाठी सरकारने विरोधी पक्ष नेत्यांनाही आमंत्रित केले पाहिजे होते.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी डॉ. रामास्वामी एन. नोडल अधिकारी
एमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटले आहे की, पंतप्रधानांनी या चिन्हाचे अनावरण करणे अनुचित आहे. त्याऐवज लोकसभा सभापतींच्या हस्ते त्याचे अनावरण होणे गरजेचे होते. सरकारने या कृतीद्वारे संविधानीक मापदंडांचे उल्लंघन केले आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.
मंत्रिमंडळ रचनेसाठी राष्ट्रपती निवडणुकीनंतरचा मुहूर्त…