वाघोली – केसनंद विकास कार्यकारी सोसायटीच्या संचालक मंडळाची निवडणूक सत्ताधारी पॅनेलच्या माध्यमातून बिनविरोध करण्यात आली होती. नवनिर्वाचित संचालकांमधून ज्ञानेश्वर विश्राम हरगुडे यांची अध्यक्षपदी तर सुरेखा रमेश हरगुडे पाटील यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. यापूर्वी वाल्मिक हरगुडे, शरद हरगुडे, रामदास ढोरे, रामदास सावंत, गणेश राणे, शिवाजी पाटोळे, सोमनाथ हरगुडे, गणेश हरगुडे, मल्हारी भंडलकर, रुक्मिणी दरेकर, वैशाली जाधव यांची संचालकपदी बिनविरोध निवड करण्यात आली होती.
केसनंदचे माजी सरपंच मिलिंद हरगुडे यांच्या गटाचे ग्रामपंचायत व सोसायटीवर वर्चस्व आहे. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा मिलिंद हरगुडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माजी सरपंच संतोष हरगुडे, तानाजी हरगुडे, शंकर वाबळे, तानाजी बांगर, प्रकाश जाधव, तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष राजेंद्र सावंत, सरपंच सचिन हरगुडे, उद्योजक रमेश हरगुडे पाटील, राजेंद्र दरेकर, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष उमेश मोरे, अनिल हरगुडे आदी उपस्थित होते.