मुंबई – राज्यातील दुकानांच्या पाट्या मराठीत मोठ्या अक्षरात असाव्यात या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे या निर्णयामुळे राज्यातील सर्व छोट्या-मोठ्या दुकानावरील पाट्या मराठी भाषेतून ठेवाव्या लागणार आहेत.
या निर्णयावर सगळीकडून प्रतिक्रिया उमटत असतानाच एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी मराठी पाट्यांच्या मुद्द्यावरुन राज्य सरकारवर टीका केली आहे.
मराठी भाषेवर इतके प्रेम असेल तर मग सरकारने आपल्या तिजोरीतील पैशांनी जितकी दुकाने आहेत त्या सर्वांच्या पाट्या तुम्ही बदला. कारण करोना काळात लोकांना मोठ्या आर्थिक संकटांचा सामना करावा लागला आहे.
यातच भविष्यात काय होईल हे माहित नाही, लॉकडाऊन पडेल की नाही?, दुकाने उघडतील का नाही. या परिस्थितीत सरकार जर म्हणत असेल दुकांनांच्या पाट्या बदला तर ते शक्य नाही,असे खासदार इम्तियाज जलील म्हटले आहे.