नवी दिल्ली : देशात घातपात घडवण्याचा मोठा कट सुरक्षा यंत्रणांनी पुन्हा एकदा उधळून लावला आहे. अल कायदा दहशतवादी संघटनेशी संबंधित 9 जणांना एनआयएने ताब्यात घेतले आहे. मुरशिदाबाद, पश्चिम बंगाल, केरळमध्ये एरणाकुलम येथे छापेमारी करत ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.
या संशयितांकडून अनेक खुलासे होण्याची शक्यता आहे. तर, अन्य आंतरराष्ट्रीय दहशतवादी कारवायांत यांचा सहभाग आहे का, याचाही तपास केला जात आहे.