मुंबई – राज्यातील करोनाचा संसर्ग पुन्हा झपाट्याने वाढताना दिसत आहे. शिवाय करोनामुळे होणाऱ्या मृत्युंच्या संख्येतही भर पडतच आहे. राज्यात आज दिवसभरात 8 हजार 333 नवीन करोनाबाधित वाढले असुन 48 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर 2.43 टक्के एवढा आहे. तर आज 4 हजार 936 जण करोनातून बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.35 टक्के आहे. आजपर्यंत राज्यात एकूण 20 लाख 17 हजार 303 जण करोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आज रोजी एकूण 67 हजार 608 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1,61,12,519 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 21,38,154 (13.27 टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 3,18,707 व्यक्ती गृहविलगीकरणात आहेत तर 2 हजार 688 व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत.