मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सत्तेची 8 वर्षे म्हणजे प्रशासनाची नसून कुशासनाची आहेत. आरएसएसच्या विचारसरणीने देशातील जातीय सलोखा बिघडवला जात आहे, असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे.
यावेळी वाढती महागाई, वाढलेली बेरोजगारी, लोकशाहीची दडपशाही, राष्ट्रीय सुरक्षेचे रक्षण करण्यात अपयश, द्वेषाचे राजकारण, रुपयाची ऐतिहासिक घसरण, आर्थिक कुचंबणा, सामाजिक जडणघडणीची झीज या भाजप सरकारच्या आठ अपयशांची देशाला वारंवार आठवण येते, असेही महेश तपासे म्हणाले.