नवी दिल्ली: 14 दिवसांत 78 जिल्ह्यांमध्ये कोरोना असलेल्या रुग्नांची नोंद झाली नाही, त्याचबरोबर गृह मंत्रालयाने म्हटले आहे की देशात लॉकडाऊन अजूनही समाधानकारक आहे आणि बऱ्याच सेवा हळूहळू शिथिल केल्या जात आहेत. आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी पत्रकार परिषदेत हि माहिती दिली.
आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल म्हणाले, 14 दिवसांपासून 78 जिल्ह्यांमध्ये कोणतीही प्रकरणे आढळली नाहीत, त्यामध्ये 33 नवीन जिल्ह्यांचा समावेश आहे. आतापर्यंत 4257 लोक बरे झाले आहेत, काल 380 लोक बरे झाले आहेत.
गेल्या 24 तासांत, 1409 नवीन प्रकरणे नोंदली गेली. देशात संक्रमित लोकांची एकूण संख्या 21,393 वर पोहचली. तसेच वैद्यकीय कर्मचार्यांवर हल्ला केल्यास कडक कारवाई करण्यात येईल. कोविड योद्धांना पाठिंबा द्यावा लागेल, त्यांना सन्मान द्या ते आदरास पात्र आहेत.