मुंबई : निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे गांभीर्य लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरीला ७५ तर सिंधुदुर्गला २५ कोटींची तातडीची मदत जाहीर केली आहे. या संकटसमयी सरकार कोकणवासियांच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभे राहील असेही त्यांनी सांगितले.
व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे मुख्यमंत्री उद्धव यांनी निसर्ग चक्रीवादळामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर या जिल्ह्यामधील झालेल्या नुकसानीचा आढावा घेत तातडीची मदत जाहीर केली. तसेच याप्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या नुकसान भरपाईचे जुने निकष बदलण्याची गरज असून नवे सुधारित निकष कसे असावेत याची माहिती प्रशासनाने सादर करावी जेणेकरून निर्णय घेता येईल असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.