पाक पंतप्रधानांची पं. नेहरू यांना तार : आठवड्यांत दिल्लींत भेट
कराची, ता. 10 :पाकिस्तानचे पंतप्रधान महंमद अली यांनी भारताचे पंतप्रधान पंडित नेहरू यांना आज एक तार पाठवून काश्मीरमधील घडामोडीसंबंधी चिंता व्यक्त केली आहे असें कळते. पाक व भारताचे प्रधानांची नियोजित बैठक ताबडतोब घ्यावी अशी पाक प्रधानांनी सूचना केली असून ही बैठक आठवडाभरांतच व्हावी असें सुचविले आहे.
काश्मीरच्या सरकारी यंत्रणेची पुनर्रचना लांचलुचपत विरोधी ट्रायब्यूनल नेमणार श्रीनगर, काश्मीरचे नवे वजीर बक्षी गुलाम मोहमद हे सरकारी यंत्रणेची पुनर्रचना करण्यांच्या विचारांत असून लांचलुचपत विरोधी ट्रायब्यूनल नेमण्यांत येणार आहें असें कळते.
राष्ट्रीय परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आज एक मोठी मिरवणूक काढून भारत व नवा काश्मीरी सरकारचा जयघोष केला.
मिरवणूक चालू असता एकें ठिकाणी शेख अब्दुल्लांचे पाठीराखे आणि मिरवणूकवाले यांच्यांत चकमक उडाली. पण नंतर अब्दुल्लांच्या पाठीराख्यांनी पळ काढला. आज आणखी 5 इसमांना अटक केली असून एकूण अटक केलेल्यांची संख्या 35 झाली आहे.
बेल्लारी सत्याग्रह थांबविण्यात आला
बेल्लारी, ता. 10 :न्या. मिश्रा शिफारशी विरोधी सुरू करण्यांत आलेला सत्याग्रह, कामी रेड्डी यांच्या आदेशानुसार थांबविण्यात आला आहे. श्री. रेड्डी यांनी 55 दिवसांचा उपवास काल सोडला. या प्रकरणीं 56 लोकांना स्थानबद्ध करण्यात आलें असून त्यांना सरकार खटले मागे घेऊन सोडण्याचा विचार करीत आहे. मद्रासचे प्रधान राजाजी यांनी रेड्डींना पत्र पाठवून उपवास समाप्तीबाबत धन्यवाद दिले आहेत.
धार्मिक शिक्षणासाठीं शाळांच्या इमारतींचा वापर
मद्रास, धार्मिक शिक्षणासाठी शाळांचे इमारतींचा वापर करण्याची सशर्त परवानगी देण्याचें मद्रास सरकारने ठरविले आहें. हे शिक्षण ऐच्छिक व शाळेच्या वेळेव्यतिरिक्त देण्यांत यावें.
धार्मिक पक्षपात नसावा, कांहीं धर्मचिन्ह, मूर्तीं ठेवूं नयें व शाळेंत व्यत्यय येऊ नये अशा अटी घातल्या जातील. श्रीनगरांत शांतता काश्मीर, काल रात्री श्रीनगर आणि उपनगरांत शांतता होती असें एका सरकारी प्रवक्त्याने निवेदन केले. माजी प्रधान शेख अब्दुल्ला यांना ठेवलेल्या उधमपूर राजवाड्याचेच सब-जेलमध्ये रूपांतर करण्यात आले आहे.