नवी दिल्ली – जम्मू काश्मीरमध्ये ऐन दिवाळीत पाकिस्तानकडून शस्त्रंसंधीचं उल्लंघन करण्यात आलं आहे. पाकिस्तानकडून गुरेज ते उरी सेक्टरदरम्यान गोळीबार करण्यात आला. यामध्ये तीन भारतीय जवान शहीद झाले आहेत, तर तीन जवान जखमी झाले आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
7-8 Pakistan Army soldiers killed in retaliatory firing by Indian Army in response to ceasefire violations from across Line of Control. The list of Pakistan Army soldiers killed includes 2-3 Pakistan Army Special Service Group (SSG) commandoes: Indian Army sources
— ANI (@ANI) November 13, 2020
पाकिस्तानकडून केलेल्या गोळीबाराला भारतीय सैन्यांनी चोख प्रत्युत्तर दिलं असून यामध्ये पाकिस्तानचे सात ते आठ सैनिक ठार केले असल्यांचे वृत्त एएऩआय या वृत्तसंस्थेने लष्कराच्या सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. तसेच या प्रत्युत्तराच्या कारवाईत पाकिस्तानचे 3 एसएसजी कमांडोदेखील मारले गेले आहेत. भारताने प्रत्युत्तरात केलेल्या कारवाईत पाकिस्तानचे बंकर्स, लाँच पॅड्स उद्ध्वस्त करत मोठं नुकसान केलं आहे.
जम्मू काश्मीरः दिवाळीपूर्वी पाकिस्तानची नापाक हरकत, तीन सेक्टरमध्ये गोळीबार
पाकिस्तानने नागरी वस्ती असलेल्या ठिकाणांना लक्ष्य करत गोळीबाराची सुरूवात केली असल्याची माहिती भारतीय लष्कराने दिली आहे. तसेच या हल्ल्यात 3 स्थानिकांचा मृत्यू तर 6 स्थानिक जखमी झाल्याची माहितीही समोर आली आहे.त्यामुळे स्थानिकांध्ये भीतीचं वातावरण असून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे.