औरंगाबाद : राज्यातील करोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून औरंगाबादमध्ये करोनाचा कहर वाढतच आहे. औरंगाबादमध्ये 48 तासात 62 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे औरंगाबादेतील करोनाबाधितांचा एकूण आकडा 239 वर पोहोचला आहे. यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
औरंगाबादेत काल (1 मे) 39 नव्या रुग्णांची नोंद झाली. तर आज (2 मे) औरंगाबादेत आणखी 23 नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे गेल्या 48 तासात 62 नवे रुग्ण औरंगाबादेत आढळले आहे. औरंगाबाद शहराचा आकडा हा 239 वर पोहोचला आहे. औरंगाबादेत धक्कादायक पद्धतीने करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. दरम्यान औरंगाबादमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे औरंगाबाद जिल्हा अलर्टवर आला आहे.
या पार्श्वभूमीवर औरंगाबादेत सम आणि विषमचा प्रयोग राबवणार आहे. त्यामुळे सम तारखेला सकाळी 11 पर्यंत सर्व जीवनावश्यक सेवा सुरु राहणार आहे. तर विषम तारखेला वैद्यकीय वगळता सर्व सेवा बंद राहणार आहेत.