राहुरी – वांबोरी चारीच्या थकीत विज बिलाच्या एक कोटी 20 लाख रुपये रक्कमे पैकी राज्य शासनाच्या टंचाई निवारण निधीतून 60 लाख रुपये विज बिल मंजूर करुन आणले असून उर्वरित रक्कमही उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केला जाईल असे आमदार शिवाजी कर्डिले यांनी सांगितले.
मुळा धरणातून वांबोरी पाईप चारीला आमदार कर्डिले यांच्या हस्ते पाणी सोडण्यात आले, यावेळी ते बोलत होते.
आ. कर्डिले म्हणाले, वांबोरी चारीबाबत काही जण निवेदने देऊन सोशल मीडियावर फोटो टाकून प्रसिध्दी मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र आपण तसे पुढारी नाही. एकदा हातात घेतलेले काम पुर्ण करण्याचे काम करतो. वांबोरी चारीतून पाणी सोडल्यावर या भागातील शेतीसह जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल.
जलसंपदामंत्री ना. गिरीश महाजन यांना भेटून 50 टक्के रक्कम मंजूर करुन आणली. राखीपौर्णीमा व स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधुन हि योजनेस रक्कम भेट म्हणून मिळाली आहे. पाणी सुरु असतांना शेतकऱ्यांनी पाईपची फोडतोड करुन पाणी घेवु नये हि जबाबदारी गावांनी घ्यावी.तसेच 100 दिवस ऐवजी 150 दिवस ही योजना चालू ठेवण्यासाठी प्रयत्न करु, शेतकऱ्यांनी संयम ठेवावा.
कार्यकारी अभियंता रावसाहेब मोरे म्हणाले, 1 कोटी 20 लाख रुपये बाकी असतांना आ.शिवाजी कर्डिले यांच्या विशेष प्रयत्नातून आज वांबोरी चारीत पाणी सोडण्यात आले आहे. 1 कोटी 20 लाख थकबाकी आहे. पण 60 लाख रुपये बिल शासन दरबारी आ. कर्डिले यांनी मंजुर करुन आणले असल्याने वांबोरी चारीत पाणी सोडण्याचे नियोजन झाले आहे.
पाथर्डीचे माजी सभापती मीर्झा मनियार, आसाराम ढुस, बाळासाहेब जठार यांनी मनोगत व्यक्त केले. अभियंता सायली पाटील, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष गायकवाड, चारुदत्त वाघ, वृध्देश्वरचे संचालक एकनाथ आटकर, शाखा अभियंता तनपुरे, उपअभियंता ढिकले, अनिल दौंड, बाळासाहेब अकोलकर, हरिशंकर खेडकर, एकनाथ ढवळे, पुरषोत्तम आठरे, वैभव खलाटे, रवी कराळे, शिवाजी साठे, बाजीराव वारे, रावसाहेब गुजाळ, बापुसाहेब आव्हाड, बबन आव्हाड, पोपट काळे, सुभाष अकोलकर आदी उपस्थित होते.