नवी दिल्ली : इराणमध्ये गेल्या 11 महिन्यांपासून ओलीस असलेल्या सहा भारतीय नागरिकांची सुटका झाली असल्याची माहिती परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांनी दिली आहे. हे सर्वजण अब्दुल रझ्झाक या जहाजावर काम करत होते.
इराणमध्ये 11 महिन्यांपासून ताब्यात घेतलेल्या ‘अब्दुल रज्जाक’ या जहाजाच्या 6 भारतीय कर्मचाऱ्यांना सोडण्यात आले आहे.
या सर्वांच्या सुटकेसाठी सहकार्य केल्याबद्दल जयशंकर यांनी इराणच्या अधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत. तेहरान इथल्या भारतीय दुतावासाने, तसेच बंदर अब्बास इथल्या भारताच्या वाणिज्य दूतावासाने केलेल्या प्रयत्नांचीही जयशंकर यांनी प्रशंसा केली आहे.