नवी दिल्ली – देशात 5-जी स्पेक्ट्रमवर आधारित मोबाईल सेवा सुरू करण्यासाठी सरकारने 5- जी स्पेक्ट्रमचे विचारान पूर्ण केले आहे. यासाठी चार कंपन्यांनी तब्बल 1 लाख 50 हजार 173 कोटी रुपयांच्या बोली लावल्या. त्यामुळे तूट वाढत असताना सरकारला उत्पन्नाचा मोठा स्त्रोत उपलब्ध झाला आहे.
या बोलीची प्रक्रिया सात दिवस चालली. मुकेश अंबानी संचलित रिलायन्स जिओ कंपनीने सर्वात जास्त 88,088 कोटी रुपयाचे स्पेक्ट्रम घेतले आहेत. त्यानंतर भारतीय एरटेल 43,084 कोटी रुपये आणि वोडाफोन 18,784 कोटी रुपये या कंपन्याचा नंबर लागतो.
थ्री-जी स्पेक्ट्रम मधून सरकारला 50 हजार 900 कोटी रुपये मिळाले होते. फोर -जी स्पेक्ट्रम मधून सरकारला 77 हजार 800 कोटी रुपये मिळाले होते. आता ही रक्कम दुपटीने वाढवून दीड लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाली आहे.
5 – जी सेवा 4- जी सेवापेक्षा दहा पट वेगवान असणार आहेत. त्यामुळे भारतातील नागरिकांना व उद्योजकांना वेगवान इंटरनेट सेवा उपलब्ध होणार आहेत. अदानी वमुहाने खासगी नेटवर्क उभारण्यासाठी 26 मेगा हार्ट फ्रिक्वेन्सी विकत घेतल्या. आता रिलायन्स जिओ आणि भारतीय एअरटेल देशभर 5- जी सेवा सुरू करण्याची शक्यता आहे. तर वोडाफोन कंपनी देशातील काही भागात 5- जी सेवा सुरू करण्याची शक्यता आहे.
या बोलीसाठी पहिल्याच दिवशी 1 लाख 45 हजार कोटी रुपयांच्या बोली बोलण्यात आल्या होत्या. मात्र त्यानंतर बोलीतील आक्रमकता कमी होत गेली आणि रक्कमही कमी होत गेली. शेवटी सातव्या दिवशी या बोली संपुष्टात आल्यानंतर याबाबतचे चित्र स्पष्ट झाले आहे. कोणत्या कंपनीला किती स्पेक्ट्रम मिळाले आणि यासाठी या कंपन्यांनी किती रक्कम मोजली याची तपशीला ताकडेवारी लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.बहुतांश कंपन्यांनी 5-फाईव्ह जी सेवा देण्यासाठीची तयारी पूर्ण केली आहे. त्यांना फक्त स्पेक्ट्रम मंजूर होण्याची
गरज होती. आता या कंपन्यांना संबंधित स्पेक्ट्रम वापरण्याची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे पुढील महिन्यापासून या कंपन्या काही प्रमाणात 5- जी सेवा सुरू करतील आणि दिवाळीत किमान दोन कंपन्या देशभर 5- जी सेवा सुरू करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या सेवा सुरू झाल्यानंतर भारतामध्ये इंटरनेटमध्ये पुढील क्रांती होणार आहे.