पद्मश्री पोपटराव पवार : संगमनेर येथील कृषी महोत्सवाची उत्साहात सांगता
संगमनेर – 57 नक्षत्र, 12 राशी आणि 3 ऋतू आपल्या शेती भोवती फिरत असतात. त्यामुळे शेतकरी दिवसेंदिवस अडचणीत सापडत चालला आहे. त्यासाठी कृषी प्रदर्शन अत्यंत महत्त्वाचे आहे. यातच शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञान समजत असल्याने हे कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरत असल्याचे प्रतिपादन पद्मश्री पोपटराव पवार यांनी केले.
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित संगमनेर कृषी महोत्सवाच्या समारोपा प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बाजीराव खेमनर होते. व्यासपीठावर आ. लहू कानडे, महानंदा दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, संगमनेर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष भाऊसाहेब कुटे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव सतीश गुंजाळ, पंचायत समितीचे उपसभापती नवनाथ आरगडे, सुनंदा जोर्वेकर, शिवाजी थोरात, मीनानाथ पांडे, सुरेश थोरात, अण्णासाहेब थोरात, प्रशांत दातीर, राजेंद्र शिंदे, डॉ. प्रशांत नाईकवाडी आदी मान्यवर उपस्थित होते.
पवार म्हणाले, रासायनिक खते आणि अति पाणी यामुळे जमिनीचे आरोग्य धोक्यात आले आहे. जमिनीची पत ढासळत चालली आहे. त्यामुळे जमीन सुपीक करून जमिनी खालच्या पाण्याची पातळी वाढवली पाहिजे. संगमनेर तालुका हा पाणीदार असल्याने येथे पिकांची प्रयोगशाळाच आहे, असे म्हणत ना. थोरात यांच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले.
आ. कानडे म्हणाले, कृषी प्रदर्शने ही शेतकऱ्यांना नवीन माहिती व तंत्रज्ञान मिळविण्याचे व्यासपीठ तयार झाले आहे. राज्याचे सेंद्रिय शेती मार्गदर्शक डॉ. प्रशांत नाईकवाडी यांनी संगमनेर तालुक्यात विषमुक्त शेती व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करून पुढच्या वर्षी राज्यभरातून विविध यशस्वी शेतकऱ्यांना आमंत्रित केले जाईल, असे सांगितले.
यावेळी शिवाजीराव जगताप, आर. बी. राहाणे, प्राध्यापक बाबा खरात, रमेश गुंजाळ, बाबासाहेब शिंदे, नानासाहेब शिंदे, नानासाहेब दिघे, रामनाथ शिंदे, संतोष हासे, रोहिदास पवार, दत्तात्रय खुळे, शांताराम कढणे, सतिश गुंजाळ, प्रशांत दातीर, राजेश शिंदे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, किरण कानवडे, अनिल थोरात, अतुल कडलक, अण्णा राहिंज आदी मान्यवर उपस्थित होते. तालुक्यातील शेतकऱ्यांना कृषीभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. प्रास्ताविक आयोजक आण्णासाहेब थोरात यांनी केले.सूत्रसंचालन नीलेश पर्बत यांनी केले, तर आभार विठ्ठल असावा यांनी मानले.
संगमनेर कृषी महोत्सवास लाखो शेतकऱ्यांनी भेट देऊन प्रदर्शनाची शोभा वाढवली. यात मुख्य आकर्षण एक टनाचा बैल होता, तर समारोपाच्या दिवशी अनेक मान्यवरांनी भेट देऊन समारोपाचा कार्यक्रम पार पडला त्यामुळे सर्वांचे आभार.
प्रशांत दातिर, अध्यक्ष, कृषी बन फार्मर प्रोड्युसर