तिरुवनंतपुरम : केरळात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. पूर आणि भूस्खलनाशी संबंधित दुर्घटनांत आतापर्यंत 57 जणांचा मृत्यू झाला आहे. दीड लाखापेक्षा अधिक लोकांना सुरक्षितपणे शिबिरात स्थलांतरित करण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे.
दोन दिवसांत कोझीकोड आणि मलप्पुरममध्ये 20 लोकांचा, तर वायनाडमध्ये 10 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात 988 शिबिरांत 1 लाख 65 हजार 519 लोक आहेत. वायनाडमधून सर्वाधिक 24 हजार 990 लोकांनी या शिबिरात आश्रय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, अद्यापही काही लोक मलप्पुरम आणि वायनाड येथे भूस्खलनामुळे ढिगाऱ्याखाली असल्याची शक्यता आहे. तेथे मदतकार्य सुरू आहे. पाण्याची पातळी वाढल्याने बाणसूर प्रकल्पाचे दरवाजे उघडण्याचे संकेतही प्रशासकिय अधिकाऱ्यांनी दिले.