पुणे – राज्यातील अतिवृष्टी आणि पूर बाधितांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार पुणे जिल्ह्यासाठी सुमारे 50 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. विधानपरिषद निवडणुकांची आचारसंहिता ज्या विभागात लागू आहे. त्या विभागात मदतीचे वाटप करताना आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची दक्षता घेतली जाणार आहे.
जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे ग्रामीण बागायती, जिरायती, हंगामी पिके, तसेच फळबागांना मोठा फटका बसला असून मोठया प्रमाणामध्ये शेती क्षेत्र बाधीत झाले आहे. तसेच घरांची पडझड झाली. ग्रामीण भागात झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहे. शासनाने शेतीपिकांच्या व फळबागांच्या नुकसानीची मदत जाहीर केली आहे.
किमान 33 टक्के नुकसान झाले आहे, अशा बाधित शेतकऱ्यांना दहा हजार रुपये प्रति हेक्टर व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी अडीच हजार रुपये प्रति हेक्टर या दराने 2 हेक्टरच्या मर्यादेत मदत देण्यात येणार आहे.